प्रतिनिधी सुधाकर ढुकरे कनेरगाव (ना)
पैनगंगा नदीच्या महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले,
कनेरगाव नाका येथे दिनांक 25 /9 /2025 रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजेच्या दरम्यान मंत्री भुसे साहेब व इतर अधिकारी तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह शेतकरी प्रमोद गावंडे यांच्या शेतात पोहोचले पुराच्या पाण्यामुळे खरडून गेलेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, नदीकाठच्या शेतकऱ्यांचे खरडून गेलेल्या शेतीचे दोन दिवसात पंचनामे करून सादर करा व त्यांना तात्काळ वेगळी मदत देण्यात येईल असे सांगितले यावेळी शेतकरी बांधव श्रीरामचंद्र पाटील गावंडे, माधवराव ठोंबे ,प्रमोद गावंडे ,अभिषेक गावंडे व इतर शेतकरी उपस्थित होते.













