प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली जिल्ह्यातून वाहणारी कयाधू नदी चे पाणी खरबी येथून भूमिगत दुसऱ्या जिल्ह्यात वळवण्याचे शासनाचे प्रयत्न पूर्ण होऊ देणार नाही अशा मोर्चा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी दिं23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आणला.
यावेळी शेतकरी बांधवाकडून सत्ताधारी पक्षांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेतकरी यांच्याकडून आमचे पाणी हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. या घोषणांनी शहर दुमदुमून गेले. या मोर्चामध्ये माजी खासदार शिवाजी माने, डॉक्टर रमेश शिंदे,संदेश देशमुख, दत्तराव कडतीकर, गजानन कावरखे, दाजीबा पाटील, एकनाथ शिंदे जवळेकर, जगन टेकाळे, परमेश्वर मांडगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सराफ, उत्तमराव वाबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.













